उदगीर— महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उत्साहवर्धक तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली. या पदयात्रेमध्ये राष्ट्रीय छात्र सेना (सर्व छात्र सैनिक) आणि एन.एस.एस. चे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
पदयात्रेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून करण्यात आले. तिरंगा पदयात्रा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापासून सुरू होऊन सोमनाथपूर परिसरात समाप्त झाली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजांची गौरवपूर्ती करत शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित वातावरणात मार्गक्रमण केले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे कमांडर डॉ. आर. पी. साबदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टी, प्रा. डॉ. एस. व्ही. भद्रशेट्टे यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment