Wednesday, April 29, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

उदगीर (30 एप्रिल 2026) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  प्रा. एम. एन. धनाश्री यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, दिनविशेष समितीचे प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, April 21, 2026

उदयगिरीचे माजी विद्यार्थी महेश मुद्दा बीएआय च्या उपाध्यक्षपदी; महाविद्यालयातर्फे गौरव सोहळा संपन्न

उदगीर  - महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश महादप्पा मुद्दा यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उदयगिरी परिवारातर्फे आयोजित या सोहळ्यात महेश मुद्दा यांच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच संस्था सदस्य प्रा. आडेप्पा अंजुरे, भीमाशंकर मुद्दा, शिवराज वल्लापुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेशअण्णा आंबरखाने, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले. सत्काराला उत्तर देताना महेश मुद्दा म्हणाले की, “आपल्या माणसांकडून मिळणारा सन्मान हा सर्वात मोठा असतो. प्रत्येक यशामागे प्रेरणा आवश्यक असते. यशानंतर समाजासाठी काम करणे हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना हार्डवर्क, हंबलनेस आणि ह्युमॅनिटी या ‘तीन एच’चा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील नागराळकर म्हणाले की, “यशस्वी व्यक्तींच्या यशाकडे न पाहता त्यांनी संकटांवर कशी मात केली, याचा अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे आहे. यश मिळवणे हाच जीवनाचा ध्यास असला पाहिजे.”
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना महेश मुद्दा यांनी सविस्तर उत्तरे देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. एस. होकरणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. सायली कुलकर्णी हिने केले.

Sunday, April 19, 2026

समतेच्या नव्या युगासाठी बसवेश्वरांचे द्रष्टेपण महत्त्वाचे – प्रा. फुलवळकर

उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले, व्याख्यानाचा विषय विषय “महात्मा बसवेश्वर यांचे द्रष्टेपण” असा होता. या प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. शिवहार स्वामी फुलवळकर यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, कार्यकारणी सदस्य शिवराज वल्लापुरे यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. हमीद अश्रफ यांनी केले, तर आभार ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार यांनी मानले. यावेळी बोलताना प्रा. फुलवळकर यांनी महापुरुषांचे विचार हे काळाच्या पलीकडे जाऊन मानवकल्याणाचा मार्ग दाखवतात, असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी समाजातील समतेचे महत्त्व अधोरेखित केले. बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांनी समता, बंधुता आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. “कायक वे कैलास” या तत्त्वातून त्यांनी कोणतेही काम लहान नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी स्थापन केलेले ‘अनुभव मंडप’ हे जगातील पहिले लोकशाही व्यासपीठ मानले जाते, जिथे सर्व जाती-धर्मातील लोकांना आणि स्त्रियांनाही समान सहभागाची संधी होती. अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि दासोह अंतर्गत शिल्लक संपत्तीचे योग्य वाटप यांसारख्या मूल्यांचा पुरस्कार करत बसवेश्वरांनी समाजाला प्रगत दिशादर्शन केले. आजच्या काळातही त्यांचे विचार अत्यंत उपयुक्त असून समाजाने ते आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समोर बसवराज पाटील म्हणाले महात्मा बसवेश्वर आजच्या समाजासाठी समाज दिशादर्शक म्हणून गरजेचे आहेत त्यांच्या प्रत्येक विचारात समाजाला समानतेची दिशा मिळते. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक तसेच कार्यालयीन व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, April 15, 2026

सर्वांसाठी समता हा आंबेडकरांच्या विचारांचा मूलमंत्र- सदाशिवराव कुलकर्णी

उदगीर-  येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सामाजिक सप्ताहांतर्गत तिसरे वैचारिक पुष्प  ‘समते विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार’ या विषयावर सदाशिवराव कुलकर्णी यांचे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य अजय दंडवते, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. एन. हल्लाळे तसेच एस. जी. कोडचे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मस्के यांनी केले. आपल्या व्याख्यानात सदाशिवराव कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सखोल मांडणी करताना सांगितले की, “बाबासाहेबांचे कर्तृत्व अथांग समुद्रासारखे आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला.” ते पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटक हा साखळीतील कडीप्रमाणे समान ताकदीचा असणे आवश्यक आहे, तेव्हाच खरी सामाजिक समता निर्माण होते. धर्मांतर करण्यापूर्वी बाबासाहेबांनी सर्व धर्मांचा अभ्यास करूनच समानतेचे तत्त्व तपासले आणि त्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. भारतीय राज्यघटनेत समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा समावेश करताना भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धर्मांतराचा मुख्य हेतू बंधुत्वाची भावना दृढ करणे हा होता, ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला बौद्धिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळेल. चवदार तळे सत्याग्रह आणि काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनाचा उद्देश हा समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय आणि सर्व ठिकाणी समान प्रवेश मिळावा, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर सर्वांचा समान हक्क असावा हा होता, असेही त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, समाजातील असमानता दूर करणे म्हणजेच समानतेचे तत्व स्वीकारणे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे यांनी मानले. शेवटी, समानतेचे तत्त्व रुजवताना समाजातील ‘आपला-परका’ हा भेदभाव नष्ट होऊन सर्वांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला.

उदयगिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वाचन, रक्तदान आणि अभिवादनाचा संगम

 


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

या निमित्ताने १८ तास अखंड वाचन उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे वाचन करून सामाजिक जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय सेवा योजना तसेच राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेची भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे मानवतेचा संदेश देण्यात आला.

ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. आंबेडकर लिखित व त्यांच्यावरील विविध पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ज्ञानार्जन केले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवराज वल्लापूरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. प्रवीण जाहुरे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा अवलंब करावा असे आवाहन केले. एकूणच, वाचन, रक्तदान आणि अभिवादनाचा संगम घडवून आणणारी ही आंबेडकर जयंती महाविद्यालयात साजरी झाली.

उदयगिरीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. महाराष्ट...